क्राईम

भयंकर! एकाच कुटुंबातील ५ जणांची निर्घृण हत्या, नंतर घरालाच लावली आग…

प्रयागराजमधील गंगापार येथे शनिवारी सकाळी एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली. थरवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवराजपूर गावात एकाच कुटुंबातील ५ जणांवर दगड- विटा आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला, आणि या सर्वांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर घराला आग लावण्यात आली. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. या घटनेची माहिती प्रदीप यादव यांनी पोलिसांना दिली. त्यांची वहिनी व इतरांची कोणीतरी हत्या केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मृतांमध्ये ५५ वर्षीय शेतकरी राजकुमार यादव, त्यांची पत्नी 50 वर्षीय कुसुम, 25 वर्षीय मुलगी मनीषा, 30 वर्षीय सून सविता आणि दोन वर्षांची नात साक्षी यांचीही हत्या करण्यात आली आहे.

एडीजी प्रयागराज झोन प्रेम प्रकाश यांनी सांगितले की, सुरुवातीच्या तपासावरून असे दिसते आहे की, दरोडेखोरांनी ही घटना लुटण्याच्या उद्देशाने केली आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी घराला आग लावल्याचे समजते. पोलीस प्रत्येक पैलूंचा बारकाईने तपास करत आहेत. फॉरेन्सिक आणि श्वानपथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.

बसपा प्रमुख मायावती यांनी या घटनेचा निषेध केला असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

14 तास ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

2 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago