Nita Ambani Phone Call To Mumbai Indians Players After 4 Consecutive Loss In Ipl 2022
मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झालेली नाही. पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीचे चारही सामने गमावले आहेत. गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा पराभव केला. चौथ्या पराभवानंतर आता थेट संघ मालक निता अंबानी यांनी खेळाडूंना फोन केला.
मुंबई इंडियन्सच्या सलग चौथ्या पराभवानंतर नीता अंबानी यांनी फोन करून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. या फोन कॉलचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. खेळाडूंशी बोलताना निता अंबानी म्हणतात की, मला तुमच्या सर्वांवर पूर्ण विश्वास आहे. आणि मला आशा आहे की आपण पुढे जाऊ. आपल्याला स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे की आपण जिंकणार आहोत. आपण याआधी ही अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे गेलो आहोत. अशा परिस्थितीतून पुढे जात आपण विजेतेपद मिळवले आहे. यामुळेच मला विश्वास वाटतो की आपण एकमेकांना साथ देऊ. जर आपण एकमेकांसोबत राहिलो तर विजय नक्कीच मिळवू. तोपर्यंत तुम्हाला जे काही हवे आहे, त्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा असेल. कृपया एकमेकांवर आणि स्वत:वर विश्वास ठेवा. मुंबई इंडियन्स नेहमीच तुमच्या सोबत असेल.
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना १३ एप्रिल रोजी पुण्यात पंजाब किंग्जविरुद्ध होणार आहे. त्यापूर्वी नीता अंबानी यांनी फोन करून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आयपीएलच्या सुरुवातीलाच सलग सामने गमावण्याची मुंबई इंडियन्सची ही पहिली वेळ नाही. २०१४ साली मुंबईने पहिल्या पाच लढती गमावल्या होत्या. त्यानंतर हंगामात १४ गुणांसह चौथे स्थान मिळवले होते. २०१५ साली पहिल्या ४ लढती गमावल्यानंतर मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली होती आणि चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…