महाराष्ट्र

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह महाराष्ट्रातही ढगाळ वातावरणासोबत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजा कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील हवामानातही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहेत. मार्च महिन्यातच वळीवासारखा पाऊस पडू लागल्याने नागरिकांसह शेतकरी वर्ग चिंतेत आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
आज सांगली, सातारा, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत असून त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील काही भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हे अवकाळी वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल
मराठवाडा भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 11 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत.

हाताशी आलेली पिके वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, कोकणात आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असला तरी राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता कायम आहे. हवामानातील सतत होणारे बदल पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…

21 तास ago

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

21 तास ago

भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…

21 तास ago

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ : वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकीचा संगम

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…

21 तास ago

राज्यात सात जिल्ह्यांत एमआरआय सेवेचे लोकार्पण ; ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवेचा विस्तार

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…

21 तास ago

फार्मर आयडी :२० मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन, अन्यथा योजनांचा लाभ बंद

मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…

21 तास ago