IPL 2020: Mumbai beat Delhi by 5 wickets
IPL 2020 : गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठी झालेल्या संघर्षात मुंबईकर दिल्लीच्या संघावर भारी पडले. क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके आणि शेवटच्या षटकांमधील पोलार्ड-कृणाल पांड्याचा संतुलित खेळ याच्या बळावर मुंबईने दिल्लीवर ५ गडी आणि २ चेंडू राखून मात केली. दिल्ली आणि मुंबई दोन्ही संघाचे ७ सामन्यांत १० गुण असले तरी मुंबई नेट रनरेटच्या बळावर ‘नंबर 1’ ठरली.
नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या डावाची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वी शॉ ४ धावांवर माघारी परतला. पहिली संधी मिळालेला अजिंक्य रहाणेही १५ धावांवर बाद झाला. कर्णधार अय्यर आणि सलामी फलंदाज शिखर धवनने दिल्लीचा डाव सावरला आणि १४व्या षटकात संघाला शतक करून दिलं. कर्णधार श्रेयस अय्यर ३३ चेंडूत ४२ धावा काढून बाद झाला. मार्कस स्टॉयनीस आणि शिखर धवन यांच्यात धाव घेण्यावरून झालेल्या गोंधळात स्टॉयनीस १३ धावांवर धावबाद झाला. पण सलामीवीर शिखर धवन शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने ५२ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या.
१६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने संयमी सुरूवात केली. पण कालांतराने कर्णधार रोहित शर्मा मोठा फटका खेळताना ५ धावांवर झेलबाद झाला. सलामीवीर क्विंटन डी कॉकने फटकेबाजी करत ३४ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलं. या स्पर्धेतील हे त्याचं दुसरं अर्धशतक ठरलं. अर्धशतक झळकावल्यावर क्विंटन डी कॉक लगेचच झेलबाद झाला. त्याने ३६ चेंडूत ५३ धावा केल्या. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने ३२ चेंडूत ५३ धावा करत ६ चौकार आणि १ षटकार खेचला. सूर्यकुमार बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेला हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. त्यानंतर कृणाल पांड्या आणि कायरन पोलार्डने संघाला विजय मिळवून दिला.
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…