काल संध्याकाळी शुक्रवार (31 जुलै) रोजी इंदापूर तालुक्यातील जंक्शन या गावाजवळ बारामती-इंदापूर राज्यमार्गावर दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये बारामती तालुक्यातील सोनगांवचे रहिवासी विश्वनाथ सिताराम गोफणे हे जखमी झाले होते. तेथे बघ्यांची गर्दी झाली होती, मात्र कोणीही मदतीसाठी येत नव्हते. जखमीच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव सुरु होता. ते रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडले होते.
याच वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे पुण्याहून आपल्या घरी चालले होते. रस्त्यालगतची गर्दी पाहून भरणे यांनी आपली गाडी थांबवून गर्दी का झाली हे विचारलं. त्यानंतर या ठिकाणी अपघात झाला असून जखमी बेशुद्धावस्थेत पडलेला आहे, असे त्यांना समजले. भरणे यांनी तात्काळ गाडीतून उतरुन या अपघाताची संपूर्ण माहिती घेत, अपघातग्रस्ताला आपल्या स्वतःच्या गाडीत हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. त्यानंतर भरणे तिथल्या एका दुचाकीवरुन घरी गेले.
घरी गेल्यानंतर भरणे यांनी जखमीच्या परिस्थितीची डॉक्टरांकडून माहिती घेतली. सध्या त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. भरणे यांनी तात्काळ अपघातग्रस्ताला आपली स्वतःची गाडी दिल्याने त्याचा जीव वाचला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…