देश

चिंताजनक! यंदा मान्सून परतण्यास होणार उशीर, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता

मुंबई : यंदा मान्सून वेळेवर आला आणि पाऊसही चांगला पडला. पण आता मान्सून वेळेवर न परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कमी दाबाची प्रणाली तयार झाल्यामुळे, यावेळी मान्सून परतण्यास उशीर होणार आहे. हा कालावधी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत किंवा त्याहूनही पुढे जाऊ शकतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात लागवड केलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते.

साधारणतः सप्टेंबरच्या मध्यात भात, कापूस, सोयाबीन, मका आणि कडधान्यांची कापणी होते. परंतु यंदा पाऊस असाच सुरू राहिला तर शेतकऱ्यांना कापणी-काढणी करणे कठीण होईल. मात्र, हिवाळ्यात पेरलेल्या गहू, हरभरा या पिकांना या वातावरणाचा फायदा होऊ शकतो, कारण माती ओलसर राहील.

भारतातील वार्षिक पाण्याच्या गरजेपैकी 70 टक्के पाणी मान्सून आणतो. त्यामुळे शेती सुधारते. जलाशय भरतात. निम्म्याहून अधिक शेती पावसाळ्यावर अवलंबून आहे. मात्र, यावर्षी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसत असल्यामुळे मान्सून परतीस विलंब होईल. यावेळी मान्सून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago