देश

ट्रेनने प्रवास करताना जास्त सामान घेऊन जाताय? भरावा लागेल दंड, जाणून घ्या नवीन नियम…

IRCTC Luggage New Rules : भारतीय रेल्वे आता मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेल्यास प्रवाशांना मोठा दंड आकारणार आहे. तसेच बुकिंग न करता अतिरिक्त सामान घेऊन जाताना पकडले गेल्यास, तुम्हाला आता सामान्य दराच्या सहा पट पैसे द्यावे लागतील.

नियमांनुसार, प्रवासी ज्या श्रेणीत प्रवास करत आहेत, त्यानुसार रेल्वेच्या डब्यात 40 किलो ते 70 किलोपर्यंतचे वजनदार सामान प्रवासी ठेवू शकतात. अतिरिक्त सामान असल्यास प्रवाशांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते.

तुम्ही ज्या डब्यातून प्रवास करत आहात त्यानुसार भारतीय रेल्वेने सामानाचे दर निश्चित केले आहेत.

  • तुम्ही एसी फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत असाल, तर तुम्ही 70 किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकता
  • एसी 2-टियरसाठी 50 किलोची मर्यादा आहे.
  • एसी थ्री टियरसाठी 40 किलोची मर्यादा आहे.
  • स्लीपर क्लाससाठी 40 किलोची मर्यादा आहे.
  • द्वितीय श्रेणीसाठी 35 किलोची मर्यादा आहे.

तुमचे सामान बुक करा
प्रवाशाने ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी बुकिंग स्टेशनच्या लगेज ऑफिसमध्ये सामान सादर केले पाहिजे. तुम्ही तिकीट बुक करतानाच अगोदरच सामानही बुक करू शकता. रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना किमान जीवनावश्यक वस्तूंसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

मंत्रालयाने ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. – “जास्त सामान असेल तर प्रवासाचा आनंद कमी होईल! ट्रेनमध्ये प्रवास करताना जास्त सामान घेऊन जाऊ नका. जास्त सामान असल्यास, पार्सल ऑफिसच्या मदतीने सामान बुक करा.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago