देश

भीषण अपघात! कारने पेट घेतल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत

छत्तीसगड : छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे गुरुवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला. राजनांदगाव खैरागड मार्गावरील सिंगारपूर गावाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत कारने अचानक पेट घेतल्याने एकाच कुटुंबातील ५ जण जिवंत जळून खाक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बालोद जिल्ह्यातील लग्न समारंभात सहभागी होऊन हे कुटुंब खैरागडला परतत होते. दरम्यान शिकारपूर गावाजवळ त्यांच्या अल्टो कारला अपघात झाला. अपघातानंतर लगेचच कारने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की त्यात बसलेल्या पाच जणांना गाडीतून बाहेरही पडता आले नाही. कारमध्ये बसलेले सर्व जण एकाच कुटुंबातील होते. या प्रकरणी पोलीस अद्याप तपास करत आहेत. सहकारी फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी तपास करत आहे.

कारचा अपघात रात्री दोनच्या सुमारास घडला. पुलाला धडकल्यानंतर अल्टो कार पलटी झाली, त्यामुळे तिला आग लागली असावी, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात ठार झालेल्यांमध्ये खैरागडमधील गोलबाजार येथील रहिवासी कोचर, त्यांची पत्नी आणि त्यांच्या २०-२५ वयोगटातील तीन मुलींचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस रात्रीच घटनास्थळी पोहोचले. पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने या घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेमागील नेमके कारण तपासानंतरच समोर येईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

9 तास ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago