State Cabinet meeting
मुंबई : औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करावे, अशी मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना नेते अनिल परब यांनी केली आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा होईल, अशी माहिती महाराष्ट्र मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.
औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. औरंगाबाद शहराचं नामकरण करुन संभाजीनगर केलं पाहिजे, असा प्रस्ताव अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. हा प्रस्ताव उद्याच्या बैठकीत मांडला जाईल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची शिवसेनेची जुनी मागणी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा गाजत आहे. आधी विकास, मग नामांतर असं म्हणत हा विषय पुढे ढकलला होता. मात्र ठाकरे सरकारवर अनिश्चिततेचे ढग घोंगावत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…