मुंबई : औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करावे, अशी मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना नेते अनिल परब यांनी केली आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा होईल, अशी माहिती महाराष्ट्र मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.
औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. औरंगाबाद शहराचं नामकरण करुन संभाजीनगर केलं पाहिजे, असा प्रस्ताव अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. हा प्रस्ताव उद्याच्या बैठकीत मांडला जाईल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची शिवसेनेची जुनी मागणी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा गाजत आहे. आधी विकास, मग नामांतर असं म्हणत हा विषय पुढे ढकलला होता. मात्र ठाकरे सरकारवर अनिश्चिततेचे ढग घोंगावत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…