The controversy in the series 'Aai Majhi Kalubai' reached Udayan Raje Bhosale
सातारा : ‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वाद आता खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं केलेल्या आरोपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्या हा वाद चर्चेत असून, मालिकेच्या चित्रीकरणालाही गावकऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकरणी अभिनेत्री अलका कुबल यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची रविवारी भेट घेतली.
सातारा चित्रीकरणाच्या सेटवर ची सर्व वस्तुस्थिती अलका कुबल यांनी उदयनराजे भोसले यांच्यासमोर मांडली. यानंतर उदयनराजेंनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोबत मोबाईलवरून चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली. काही संघटनांनी मागणी केली आहे कि, अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागावी तसेच मालिकेतील प्रमुख कलाकार विवेक सांगळेला मालिकेतून काढून टाकावे. असे झाले नाही तर साताऱ्यात सुरु असलेलं मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी देखील दिली आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीची माहिती उदयनराजे भोसले यांनी ट्विट करून दिली.
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…
मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…
मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…