मनोरंजन

‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील वाद पोहोचला उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत

सातारा : ‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वाद आता खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं केलेल्या आरोपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्या हा वाद चर्चेत असून, मालिकेच्या चित्रीकरणालाही गावकऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकरणी अभिनेत्री अलका कुबल यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची रविवारी भेट घेतली.

सातारा चित्रीकरणाच्या सेटवर ची सर्व वस्तुस्थिती अलका कुबल यांनी उदयनराजे भोसले यांच्यासमोर मांडली. यानंतर उदयनराजेंनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोबत मोबाईलवरून चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली. काही संघटनांनी मागणी केली आहे कि, अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागावी तसेच मालिकेतील प्रमुख कलाकार विवेक सांगळेला मालिकेतून काढून टाकावे. असे झाले नाही तर साताऱ्यात सुरु असलेलं मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी देखील दिली आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीची माहिती उदयनराजे भोसले यांनी ट्विट करून दिली.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

22 तास ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

22 तास ago

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…

23 तास ago

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…

23 तास ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…

2 आठवडे ago

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…

3 आठवडे ago