David Warner explained the reason for Sunrisers Hyderabad's defeat
इंडियन प्रीमियर लीगच्या क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत फायनलमध्ये स्थान मिळवले. या पराभवानंतर SRH चा कर्णधार डेविड वॉर्नरने पराभवाला खराब क्षेत्ररक्षण जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
डेविड वॉर्नर म्हणाला, जर आपण सामन्यात कॅच सोडत असू तर आपण मॅच जिंकू शकत नाही. मला वाटतं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आम्ही खराब सुरुवातीनंतरही सामन्यात वापसी केली होती. मात्र खराब क्षेत्ररक्षण आमच्या पराभवाचं कारण ठरलं. या सामन्यात दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनिस या दोघांचेही झेल सुटले. धवनने 50 चेंडूत 78 तर स्टॉयनिसने 27 चेंडूत 38 धावा केल्या आणि संघाला मजबूत सुरुवात करुन दिली. पराभवानंतर वॉर्नर म्हणाला कि, आयपीएल 2020 चा प्रवास चांगला झाला. तिसऱ्या स्थानी राहाणं अभिमानाची बाब आहे, कारण कुणीही असा विचार केला नव्हता की आम्ही तिसऱ्या स्थानी राहू शकू.
दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदाचं फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने 20 षटकात 189 धावांचे लक्ष्य उभारले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ 172 धावापर्यंतचं मजल मारु शकला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…