क्राईम

रागाच्या भरात तरुणाने बहिणीची गोळ्या घालून केली हत्या, कारण…

उत्तर प्रदेश : एका तरुणाने आपल्या बहिणीची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आले आहे. मेरठ जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाची बहिण तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली होती, त्यामुळे तो खूप चिडलेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधील सरधना भागातील छूर गावात राहणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीचे गौरव नावाच्या एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी ती या तरुणाबरोबर घरातून पळून गेली होती. पण त्यानंतर दुसर्‍याच दिवशी ती घरी परत आली. परंतु, बहीण घरातून पळून गेल्याचा राग डोक्यात असल्यामुळे भावाने तिला बघताक्षणीच तिची गोळ्या घालून हत्या केली.

भयंकर! महिलेने मुलांना खोलीच्या बाहेर काढून नवऱ्यावर केला हल्ला.. नंतर केलं असं काही…

मेरठ पोलिसांनी सांगितले की, 13 जून रोजी ही मुलगी आणि गौरव घरातून पळून गेले होते. त्यानंतर 14 जूनला ही मुलगी घरी परतली. मुलीच्या पळून जाण्यामुळे तिचा भाऊ शेखर खूप रागावला होता. त्यामुळे शेखरने आपल्या बहिणीला गोळ्या घालून ठार केले. मात्र, कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच शेखर तेथून पसार झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपास सुरु केला आहे.

भीषण अपघात! ट्रकचालक करत होता ओरल सेक्स, एका महिलेचा मृत्यू तर…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago