पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली की निर्बंध शिथील झाल्यानंतर फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर तसंच राज्याच्या बाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परत आल्यानंतर 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, तसे आदेश काढावे लागतील, तज्ज्ञांनी तसा सल्ला दिला आहे.
अजित पवार म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही विकेंडला विनाकारण फिरणाऱ्या पर्यटकांमुळं पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. नागरिक शनिवार आणि रविवारी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. त्यामुळे सर्व प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी चर्चा करुन निर्णय घेतला आहे की, पुण्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळून इतर दुकानं बंद राहतील. सोमवारी ते शुक्रवार नियमांप्रमाणे दुकानं सुरु राहणार आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली तर कदाचित नियमात बदल केला जाईल.
अजित पवार यांनी यावेळी सांगितलं कि, “सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, उस्मानाबाद या सारख्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण जात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेले 53 टक्के कोरोना रुग्ण 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 43 टक्के मृत्यू हे कोणतीही को-मॉर्बिडीटी नसलेल्या नागरिकांचे आहेत. तर 20 टक्के मृत्यू हे 31 ते 45 वयोगटातील आहे.”
ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच…
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित 'मतासाठी निधी' या…
मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले…
मुंबई, दि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि…
मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून…
मुंबई, दि. २४ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…