government plans to quarantine those for 15 days who returning from another district says deputy cm ajit pawar
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली की निर्बंध शिथील झाल्यानंतर फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर तसंच राज्याच्या बाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परत आल्यानंतर 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, तसे आदेश काढावे लागतील, तज्ज्ञांनी तसा सल्ला दिला आहे.
अजित पवार म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही विकेंडला विनाकारण फिरणाऱ्या पर्यटकांमुळं पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. नागरिक शनिवार आणि रविवारी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. त्यामुळे सर्व प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी चर्चा करुन निर्णय घेतला आहे की, पुण्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळून इतर दुकानं बंद राहतील. सोमवारी ते शुक्रवार नियमांप्रमाणे दुकानं सुरु राहणार आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली तर कदाचित नियमात बदल केला जाईल.
अजित पवार यांनी यावेळी सांगितलं कि, “सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, उस्मानाबाद या सारख्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण जात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेले 53 टक्के कोरोना रुग्ण 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 43 टक्के मृत्यू हे कोणतीही को-मॉर्बिडीटी नसलेल्या नागरिकांचे आहेत. तर 20 टक्के मृत्यू हे 31 ते 45 वयोगटातील आहे.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…