lost of smell and taste good symptoms of corona patient
मुंबई : काही जणांना कोरोना झाल्यानंतर वास आणि चव जाणं अशा प्रकारची लक्षणं जाणवतात. कोरोना संसर्गामुळे चव आणि वास घेण्याची क्षमता जाते. सर्वच कोरोना रुग्णांमध्ये हे लक्षण असेलच असं नाही. पण ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसत आहेत, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. चव न लागणं आणि वास न येणं असं लक्षण असणं म्हणजे तुम्हाला गंभीर स्वरूपाचा कोरोना नाही. तुम्हाला रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडत नाही.
कोरोना संक्रमित लोकांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी आहे. ज्यांना वास आणि चव जाणं अशा प्रकारची लक्षणं जाणवतात, असे रूग्ण गंभीर धोक्यापासून दूर राहतात. जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये 220 रुग्णांवर केलेल्या संशोधनात हे उघड झाले आहे.
संशोधक डॉ. हरेंद्र कुमार सांगतात की संशोधनासाठी दोन प्रवर्ग तयार केले गेले. यामध्ये, एका प्रवर्गात असे रूग्ण होते ज्यांना चव आणि वास येत नव्हता. तर दुसऱ्या प्रवर्गात चव आणि वास येत असणारे रुग्ण होते. या दोन प्रवर्गांचा तुलनात्मक अभ्यास केला गेला. तेव्हा असे दिसून आले की चव व वास न येणारे बहुतेक रुग्ण सामान्य औषधे आणि घरगुती विलगीकरणात बरे झाले. ते 10 ते 15 दिवसांत कोरोना निगेटिव्ह देखील झाल्याचे आढळले. तथापि, चव आणि वास न येण्याची तक्रार काहींमध्ये दीड महिन्यांपर्यंत राहिली. वास आणि चव न येणाऱ्या 9 जणांना तर वास आणि चव येणाऱ्या ३४ जणांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.
डॉ. हरेंद्र कुमार सांगतात की तपासणी दरम्यान असे आढळले की नाकात सापडलेल्या घाणेंद्रियाच्या ग्रंथीवर कोरोनाने जबरदस्त हल्ला केला होता. परंतु, त्यामुळे कोरोना विषाणू तिथेच राहिला आणि तो मेंदूच्या दिशेने किंवा फुफ्फुसात जाऊ शकला नाही. अशा परिस्थितीत मेंदू आणि श्वसन प्रणाली सुरक्षित राहते आणि रूग्ण तीव्र ऑर्गन फेल्युअरपासून वाचतात.
डॉ. अमोल अन्नदाते यांनी देखील आपल्या युट्यूब चॅनेलमधून अशाच प्रकारची माहिती दिली आहे.
डॉ. अमोल अन्नदाते म्हणाले, “ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं असतात ते फार गंभीर नसतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज फार भासत नाही. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी फार कमी होत नाही आणि त्यांच्या फुफ्फुसांवर या आजाराचा परिणाम कमी होतो. त्यामुळे कोरोना संक्रमित असाल आणि अशी लक्षणं असेल तर खरंतर तुमच्यासाठी हा दिलासा आहे. पण याचा अर्थ असा नाही ही तुम्ही दुर्लक्ष करायला हवं. ऑक्सिजनची पातळी सातत्याने तपासत राहायला हवी.”
वास आणि चव घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्यावर ही क्षमता परत येईल का नाही अशी भीती लोकांमध्ये असते. पण रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतर वास आणि चव या दोन्ही गोष्टी पुन्हा सुरळीत होतात.
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…