Highest Score In IPL History: Which Team Is The Owner Of The All-time IPL Record?
इंडियन प्रीमियर लीग ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय क्रीडा स्पर्धा मानली जाते. जेव्हा जेव्हा आयपीएलचा हंगाम येतो तेव्हा तेव्हा चाहते नवीन रेकॉर्डचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या टीव्ही स्क्रीनसमोर बसून राहतात आणि दुसरीकडे यातून क्रिकेटमध्ये नवीन स्टार खेळाडू उदयास येतात. आयपीएलमध्ये टी-२० स्वरूपाच्या या खेळात अनेक विक्रम झाले आणि ते मोडताने देखील आपण पाहिले आहेत. 23 एप्रिल २०१३ रोजी दोन मोठे रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. आजही ते कायम आहेत.
आयपीएलच्या इतिहासात कोणत्या संघाने सर्वाधिक धावा केल्या आहेत?
आयपीएलमध्ये 23 एप्रिल 2013 रोजी बेंगळुरू येथे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा नोंदविण्यात आल्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सहारा पुणे वॉरियर्स यांच्यात हा सामना झाला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 263/5 धावांची नोंद केली आणि आयपीएलमधील सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदविला. या सामन्यात ख्रिस गेल याने 66 चेंडूंत नाबाद १७५ धावा केल्या. ख्रिस गेलने १३ फोर आणि १७ सिक्स लगावले होते. त्यात त्याचा स्ट्राइक रेट 265.15 होता. सहारा पुणे वॉरियर्सने २० षटकांत केवळ १33 धावा केल्या होत्या. ख्रिस गेल १७५ धावाकरत सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग?
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग IPL २०२० मध्ये झाला होता. IPL २०२० चा 9 वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 27 सप्टेंबर 2020 रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झाला होता. यात पंजाब किंग्जने 223 धावांची नोंद केली. मयंक अग्रवालने 50 चेंडूत 106 धावांचे शानदार शतक झळकावले.
त्या बदल्यात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी करत ३ चेंडू शिल्लक असतानाच टार्गेट पूर्ण करून सामना जिंकला. त्यात संजू सॅमसन आणि स्टीव्ह स्मिथने प्रत्येकी 85 धावा आणि 50 धावा केल्या. राहुल तेवतियाने 31 चेंडूत 53 धावा करून डाव पुढे नेला तर जोफ्रा आर्चरने राजस्थान रॉयल्सकडून दोन षटकार ठोकत खेळ संपविला. संजू सॅमसनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…