Mumbai Indians beat Chennai, Mumbai Indians win by 4 wickets
मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने धावांचा पाऊस पाडत मुंबई इंडियन्सनंसला २१८ धावांचं कडवं दिल. मुंबई इंडियन्सनं ते आव्हान ४ विकेट राखून गाठलं. कायरन पोलार्डनं वादळी खेळी करत अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांची तुफान खेळी साकारली आणि मुंबई इंडियन्स संघासाठी विजय खेचून आणला. आयपीएलमध्ये मुंबईच्या संघानं आजपर्यंत दोनशे धावांच्यावरील आव्हान गाठण्यात कधीच यश आलं नव्हतं. पण आज कायरन पोलार्डच्या वादळी खेळीमुळे ते शक्य झालं.
दिल्लीतील अरुण जेटली मैदानात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक या जोडीने 71 धावांची खेळी करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सुर्यकुमार अवघ्या 3 धावांची भर घालून फिरला. कायरन पोलार्डने 34 चेंडूतील 87 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 219 धावांचं कडवं आव्हान पार कारण संख्या झालं. चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात मुंबईला 16 धावांची गरज होती. एनिग्डीच्या गोलंदाजीत 16 धावा करुन पोलार्डने संघाला विजय मिळवून दिला.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिल्या ओव्हरमध्ये बोल्टने चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का दिलाय. ऋतूराज गायकवाड अवघ्या 4 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर फाफ ड्युप्लेसी आणि मोईन अली या जोडीने चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. बुमराहने मोईन अलीच्या रुपात मुंबई इंडियन्सला दुसरे यश मिळवून दिले. पोलार्डने अर्धशतकी खेळी करणाऱ्या फाफ ड्युप्लेसीसह रैनाची विकेट घेतली. त्यानंतर रायडू आणि रविंद्र जडेजाने मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रायडूने 27 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकाराच्या मदतीने 72 धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला जडेजाने 22 चेंडूत 22 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. या दोघांनी 5 व्या विकेटसाठी केलेल्या 102 धावांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्डजने 4 गड्यांच्या मोबदल्यात 218 धावा केल्या आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…