क्रीडा

IND vs PAK T20 : आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना

IND vs PAK : T20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान हा ब्लॉकबस्टर सामना आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु होणार आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये तब्बल 2045 दिवसांनी म्हणजेच 5 वर्षे, 7 महिने आणि 5 दिवसांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे.

भारताकडे एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक मिळून पाकिस्तानला सलग 13व्यांदा पराभूत करण्याची संधी आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत भारतावर पहिला विजय मिळवण्याची पाकिस्तानकडे संधी आहे.

आयपीएलच्या फेज-2 मधील सामन्यांच्या आधारावर बघितले तर दुबईच्या खेळपट्टीवर 150 ते 170 धावा केल्या जातात. फेज-2 मध्ये येथे 13 सामने खेळले गेले. यापैकी नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 9 सामने जिंकले. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ 4 सामन्यांमध्ये विजय मिळाला. या दृष्टीने भारत-पाकिस्तान सामन्यात नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षणाला प्राधान्य देऊ शकतो.

या सामन्यात पाकिस्तानच्या विजयाकडे बोट दाखवणारा कोणताही मोठा पैलू नाही. T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग पाचवेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही भारतीय संघाने पाकिस्तानपेक्षा खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आजचा सामना पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

9 तास ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

2 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago