how you to keep good health in winter season
हिवाळ्याची चाहूल लागली असून थंडी पडायला सुरूवात झाली आहे. हिवाळा हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल मानला जात असला तरी या ऋतूत आजार लवकर जडतात. थंडीचा प्रभाव प्रथम त्वचेवर, शरीरावर आणि क्रियाकलापांवर सुरू होतो. आपण सहसा उन्हाळ्यात कमी अन्न खातो, त्या तुलनेत हिवाळ्यात भूकही वाढते. या ऋतूमध्ये प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. अशा परिस्थितीत, सावधगिरी बाळगण्याची आणि अशा काही उपायांचा अवलंब करण्याची गरज असते जेणेकरून रोग तुमच्यापासून दूरच राहतील. हिवाळ्याच्या मोसमात स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण बघूया.
आहाराची विशेष काळजी : हिवाळ्याच्या ऋतूत खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते, कारण या ऋतूमध्ये अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. जर तुम्ही धान्य (Whole grains), ओटमील इत्यादी खाल्ले तर ते वजन कमी करण्यासाठी आणि हृदयासाठी देखील फायदेशीर ठरतात.
थंडीपासून संरक्षण महत्त्वाचे : हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा. या दरम्यान विशेषतः पाय, डोके आणि कान झाकून ठेवावेत. हिवाळ्यात किमान 6 ते 8 तास झोप घ्यावी. जसे थंडीच्या मोसमात शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे उबदार पदार्थांचे सेवन केले जाते. थंडीच्या मोसमात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण या ऋतूतील हवेमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणून हातात हातमोजे आणि चेहऱ्यावर स्कार्फ घालावा.
पाणी : हिवाळ्यात सहसा तहान कमी लागते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. हे टाळण्यासाठी थोड्या-थोड्या वेळाने पाणी पित राहावे. यासोबतच काकडी, टरबूज, संत्री, टोमॅटो यांसारखे अन्नपदार्थ अधिक प्रमाणात खावे.
व्यायाम महत्त्वाचा : शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर त्यासाठी हिवाळ्यापेक्षा चांगले हवामान दुसरे असूच शकत नाही. या दरम्यान तुम्ही तुमचे वजन नियंत्रित ठेवायला हवे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा. जर तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करता येत नसेल तर रोज फिरायला जाणे चांगले. चालण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि रक्त प्रवाह वाढतो.
या ऋतूत आंघोळीबाबत अनेक गैरसमज आहेत. काही लोक थंड पाण्याने तर काही गरम पाण्याने आंघोळ करण्याविषयी बोलतात. पण विनाकारण आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले. पाणी खूप थंड किंवा जास्त गरम नसावे.
वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी : सकाळच्या वेळी दाट धुके असते. थंड हवेमुळे घराबाहेर पडणे कठीण होते. अशा परिस्थितीत वृद्धांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. विशेषतः श्वसनाचे त्रास असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी, तिथे त्यांचा त्रास खूप वाढू शकतो. लहान मुलांना देखील गर्दीत नेणे टाळावे, तेथे त्यांना संसर्गजन्य आजार जडण्याची शक्यता असते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…