sanjay raut
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत आम्हीच जिंकणार, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की विरोधकांनी कितीही आपटा, आमचाच उमेदवार निवडून येणार. कोणी कितीही ताणाताणी करा, आरडाओरडा करा पण आम्हीच जिंकणार यात काही शंका नाही.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकांसंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आपणच जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच सामंजस्याने, मोठ्या मनाने निवडणुका बिनविरोध कराव्यात असं प्रतिपादनही त्यांनी केलं आहे. ते म्हणाले, “विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला, ताणाताणी केली तरीही शेवटी आम्हीच जिंकणार आहे. शंकेचं वातावरण जरी निर्माण केलं तरी विरोधी पक्षाला यश मिळणार नाही. त्यामुळे सामंजस्याने, मोठ्या मनाने निवडणुका टाळता आल्या तर महाराष्ट्रावर फार उपकार होतील.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…