Former Chief Minister kumarswami regrets joining hands with congress
बेंगलुरू : जनता दल सेक्युलर नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्यावर षडयंत्र केल्याचा आरोप करत म्हटले की त्यांचा इतका मोठा विश्वासघात भाजपानेही केला नव्हता. पुढे ते म्हणाले की ते जाळ्यात अडकले होते. काँग्रेसशी हातमिळवणी करून त्यांच्या पक्षाने राज्यातील जनतेचा १२ वर्षांचा विश्वास गमावला.
कुमारस्वामी म्हैसूर इथे बोलताना म्हणाले कि, ‘मी भाजपबरोबर चांगले संबंध ठेवले असते तर मी अजूनही मुख्यमंत्री असतो. मी २००६-०७मध्ये राज्यातील जनतेचा विश्वास जिंकला होता आणि तो १२ वर्षे कायम ठेवला होता, पण काँग्रेसशी हातमिळवणी करून मी तो गमावला.’ ते म्हणाले की त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करायला नको होती, ज्यांनी जनता दल सेक्युलरला भाजपाची बी टीम म्हणत प्रचार केला होता. पण पक्षाचे सर्वेसर्वा एच डी देवेगौडा यांच्या दबावामुळे ते ही आघाडी करण्यास तयार झाले. पुढे ते म्हणाले, ‘माझ्या पक्षाला ताकद गमावून याची किंमत द्यावी लागली. कुमारस्वामी यांनी स्पष्टीकरण दिलं की, ते देवेगौडा यांना दोष देत नाहीत, कारण ते धर्मनिरपेक्षतेची ओळख असलेल्या आपल्या वडिलांचा सन्मान करतात.
२०१८मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर राजकीय समीकरण बदलत एकमेकांविरोधात निवडणूक लढवलेले काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. सत्तास्थापनेनंतर कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षी दोन्ही पक्षांनी एकत्र लोकसभा निवडणूक लढवली त्यानंतर युतीत मतभेद निर्माण झाले आणि काही आमदारांच्या बंडखोरीमुळे सरकार कोसळले.
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…
मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…
मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…