मुंबई : मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत. या महापालिकांसाठी मतदान 15 जानेवारी रोजी होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. यासाठी आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील 29 महापालिकांमध्ये एकूण 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करतील, तर एकूण मतदार केंद्रांची संख्या 39,147 आहे. मुंबईसाठी 10,111 मतदार केंद्रे, कंट्रोल युनिट 11,349 आणि बॅलेट युनिट 22,000 ठरवण्यात आले आहेत.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या 5-7 वर्षांपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या महापालिकांच्या निवडणुकीस मार्ग मोकळा झाला. सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या, आणि आता प्रलंबित 29 महापालिकांसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे.
महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक
राज्यातील 27 महापालिका निवडणुकीसाठी मुदत संपली आहे. यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांमध्येही निवडणूक होणार आहे. या महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरली जाईल.
निवडणूक खर्चाची मर्यादा
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांचा खर्च आयोगाने ठरवलेला आहे:
मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावे लागणार आहे, तर उर्वरित 28 महापालिकांमध्ये 1 ते 5 सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान होईल.
उमेदवारीसाठी नियम
मतदार जनजागृतीसाठी रील तयार केल्या गेल्या आहेत. जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा, रँप आणि व्हीलचेअर उपलब्ध राहतील.
राज्यातील 1,96,605 कर्मचारी या निवडणुकीसाठी काम करतील. मतदानापूर्वी 48 तास प्रचारावर बंदी असेल, तसेच त्या कालावधीत जाहिरातींवरही बंदी राहील.
महिला व आरक्षित वर्गासाठी जागा
राज्यातील 29 महापालिकांमध्ये एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे:
दुबार मतदार
मुंबईत 11 लाख संभाव्य दुबार मतदार आहेत, जे एकूण मतदारांचा सुमारे 7% आहे. यांचा शोध घेऊन त्यांच्यासाठी नावासमोर दोन स्टार चिन्ह ठेवण्यात आले आहे. ज्यांच्यावर सर्वेक्षण झाले नाही, त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेण्यात येईल.
निवडणूक होणाऱ्या महापालिका
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…