farmers bill passes in Rajya Sabha
नवी दिल्ली: कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक ही तीन विधेयकं लोकसभेत मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर ही विधेयकं राज्यसभेत मांडण्यात आली ज्यावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे या गदारोळातच राज्यसभेत हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले आहे.
दरम्यान, सभागृहातील गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. विधेयकाला विरोध करताना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. कॉंग्रेसचे खासदार टी.एन प्रथपन यांनी कृषी विधेयक हे देशभरातील शेतकर्यांच्या विरोधी असल्याचे सांगत लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली.
तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांना सभागृहाचे नियम पुस्तिका दाखवली आणि त्यानंतर त्याच्या समोर जाऊन ती फाडली देखील तर अनेक खासदारांनी आपल्या समोर असणारे माईकदेखील तोडून टाकले. तसंच उपसभापतींसमोर असणारे माईक देखील तोडण्यात आले त्यामुळे सभागृहातील गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे
तोमर म्हणाले की, ‘दोन्ही विधेयके ऐतिहासिक आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडतील. या विधेयकांच्या तरतुदीनुसार शेतकरी कोठेही आपली पिके विकू शकतील व त्यांना इच्छित भावाने आपला माल विकण्याचे स्वातंत्र्य असेल. तसेच शेतकऱ्यांना संरक्षण देण्याच्या तरतुदीही करण्यात आल्या आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…