farmers bill passes in Rajya Sabha
नवी दिल्ली: कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक ही तीन विधेयकं लोकसभेत मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर ही विधेयकं राज्यसभेत मांडण्यात आली ज्यावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे या गदारोळातच राज्यसभेत हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले आहे.
दरम्यान, सभागृहातील गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. विधेयकाला विरोध करताना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. कॉंग्रेसचे खासदार टी.एन प्रथपन यांनी कृषी विधेयक हे देशभरातील शेतकर्यांच्या विरोधी असल्याचे सांगत लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली.
तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांना सभागृहाचे नियम पुस्तिका दाखवली आणि त्यानंतर त्याच्या समोर जाऊन ती फाडली देखील तर अनेक खासदारांनी आपल्या समोर असणारे माईकदेखील तोडून टाकले. तसंच उपसभापतींसमोर असणारे माईक देखील तोडण्यात आले त्यामुळे सभागृहातील गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे
तोमर म्हणाले की, ‘दोन्ही विधेयके ऐतिहासिक आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडतील. या विधेयकांच्या तरतुदीनुसार शेतकरी कोठेही आपली पिके विकू शकतील व त्यांना इच्छित भावाने आपला माल विकण्याचे स्वातंत्र्य असेल. तसेच शेतकऱ्यांना संरक्षण देण्याच्या तरतुदीही करण्यात आल्या आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…