Aditya Thackeray plans to launch private offices and local services in Mumbai at full capacity by mid-October
मुंबई : मुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने सोमवारीच दोन लाखांचा टप्पा ओलांडला. ही बातमी ताजी असतानाच मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं कि ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी ऑफिसेस आणि मुंबईतली लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे.
खासगी कार्यालयं २४ तास सुरु रहावीत असा आमचा विचार आहे जेणेकरुन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वेळांमध्ये येण्याची मुभा राहिल. लोकलही पूर्ण क्षमतेने ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरु करण्याचा विचार आहे. जर खासगी ऑफिसेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले तर लोकल्समध्ये होणारी गर्दी कमी होऊ शकते असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
करोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करुन देणं, वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देणं ही जशी सरकारची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे आपण घराबाहेर पडताना आपली काळजी घेणे आणि करोनाचा प्रादुर्भाव होऊ न देणं ही नागरिकांची जबाबदारी आहे. कारण आपण आपली काळजी घेतली नाही तर आपण फक्त आपला धोका वाढवत नाही तर कुटुंबाचाही धोका वाढवतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. बाहेर पडताना सॅनिटायझर, मास्क यांचा वापर करणं आवश्यक आहे. एवढंच नाही तर सोशल डिस्टन्सिंगही पाळलं गेलंच पाहिजे असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…