nirmala sitaraman
पंजाबमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्या शांततेवर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या घटनेबद्दल राज्य सरकारला घेरणाऱ्या कॉंग्रेसला भाजपने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी पंजाबमधील होशियारपूरमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर केलेल्या अमानुषतेचा निषेध केला आणि म्हटले की या जघन्य घटनेबद्दल कॉंग्रेसचे मौन खेदजनक आहे.
सीतारमण यांनी घटनेवरून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनाही लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, तेजस्वी यादव बिहारच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवर प्रश्न न विचारता प्रचारात व्यस्त आहेत. राजस्थानसारख्या कॉंग्रेस शासित राज्यांमध्ये घडलेली बलात्काराची प्रकरणं राहुल गांधी यांना दिसत नाहीत. हाथरस प्रकरणात मात्र सर्व कॉंग्रेस नेते प्रदर्शन सुरू करतात. सीतारमण म्हणाल्या कि महिला सुरक्षेच्या गंभीर विषयावर राजकारण करून कॉंग्रेस आपल्या अस्तित्वाचा शोध घेत आहे, हे दुःखद आहे.
सीतारमण यांनी सांगितले की, पंजाबच्या होशियारपूर येथे बिहार प्रवासी मजूराच्या मुलीवर अत्याचार झाला. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी होशियारपूर आणि राजस्थानमधील घटनांबाबत हाथरस प्रकरणात दाखवला तसा सक्रियपणा का दाखविला नाही? प्रत्येक विषयावर ट्वीट करणारे राहुल गांधी यांनी ना ट्वीट केले ना ते पिकनिकला गेले. कॉंग्रेस पक्षाची प्रमुख स्वत: एक महिला आहे. अशा प्रकारे निवडक घटनांवर प्रतिक्रिया देणं कॉंग्रेसला शोभतं का?
निर्मला सीतारामन म्हणाल्या कि, पीडित कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि वेळीच न्याय मिळावा यासाठी भाजप संघर्ष करेल.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…