uttarakhand Glacier Burst : Indian Airforce Deployed In Rescue
नवी दिल्ली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवन भागात हिमनदी फुटल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून १५० पेक्षा जास्त जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय हवाईदलाकडून मदत पुरवण्यात येत आहे. जवळपास १३ गावांचा संपर्क अजूनही तुटलेला असल्याचं समोर आलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून या भागात हेलिकॉप्टरच्या मदतीनं अन्न-धान्याची पाकिटं नागरिकांना पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एनडीआरएफ आणि भारतीय हवाईदलाला संयुक्तपणे बचावकार्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय हवाईदलाकडून तीन हेलिकॉप्टर मदतीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये दोन ‘एमआय १७’ आणि एका ‘एएलएच ध्रव’ या हेलिकॉप्टरचा समावेश आहे. रविवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशनसाठी भारतीय हवाईदलाकडून हे तिनही हेलिकॉप्टर ‘डिझास्टर रिलीफ टीम’सोबत देहरादूनहून जोशीमठासाठी रवाना झाले आहेत.
भारतीय हवाईदलाकडून गरज पडल्यास आणखी विमानांना मदतीसाठी तैनात करण्यात येईल. हवाईदलाच्या सी १३० आणि AN ३२ या एअरक्राफ्टच्या मदतीनं जॉली ग्रान्ट विमानतळाहून एनडीआरएफ कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट करण्यात आलं. भारतीय हवाईदलाकडून रविवारी सायंकाळी हिंडनहून सी १३० द्वारे ६० जवानांसहीत पाच टन भार एअरलिफ्ट करण्यात आला. तर जॉली ग्रँटवर तीन Mi -17 देखील तैनात करण्यात आले आहेत.
बचावकार्यासाठी भारतीय लष्कर, एसडीआरएफ, आयटीबीपी आणि भारतीय वायुसेनेसहीत इतरही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलीय. रविवारी हिमनदी फुटल्याचं समजताच आयटीबीपी, एनडीआरएफ आणि एडीआरएफची टीम बचावकार्यात सक्रीय झाली होती. तर हवाईदलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
आयएएफने दिलेल्या नुकसानीच्या अहवालानुसार, धौली गंगा आणि ऋषी गंगा यांच्या संगमावरील तपोवन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर धरण संपूर्णपणे नष्ट झाले आहे. मलेरी खोऱ्याच्या सुरूवातीला बांधलेले दोन पूलही नष्ट झाले आहेत. जोशीमठ आणि तपोवन यांना जोडणारा मुख्य रस्ता सुरक्षित आहे. तपोवनमधील बर्याच भागात प्रचंड नुकसान झालं आहे. पिपलकोटी, चमोली तसेच धौली गंगा आणि अलकनंदा हे भाग देखील प्रभावित झाले आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…