13 Dies After They Accidentally Fell Into A Well In Kushinagar During Haldi Ceremony
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील नेबुवा नौरंगिया येथे रात्री उशिरा झालेल्या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गावातील एका घरात लग्न समारंभ सुरू असताना विहिरीवरील स्लॅब कोसळून त्यावर उभे असलेले अनेक जण विहिरीत कोसळले व या दुर्दैवी अपघातात १३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून महिलांना धक्का बसला आहे. दरम्यान, स्लॅब तुटण्याची शक्यता व्यक्त करत महिलांना तिथे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे कुटुंबातील काही महिलांनी सांगितले आहे.
ही घटना एवढी भीषण होती की संपूर्ण गावात खळबळ उडाली. लग्नघरात एकच गोंधळ उडाला. गावातून जिल्हा रुग्णालयापर्यंत आक्रोश सुरु होता. आयुक्त, डीआयजी, डीएम, एसपी घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्याची माहिती घेतली. तसेच त्यांनी पीडितांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नौरंगिया गावातील रहिवासी परमेश्वर कुशवाह यांचा मुलगा अमित कुशवाह याच्या लग्नापूर्वी बुधवारी रात्री उशिरा हळदीचा विधी पार पडला. घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीसमोर मटकोड (विवाहपूर्व सोहळा) सुरू होता. ज्या विहिरीजवळ हा कार्यक्रम सुरू होता ती जाळीदार स्लॅब बनवून बंद करण्यात आली होती. विधीच्या वेळी विहिरीवर बनवलेल्या स्लॅबवर महिला, तरुणी मोठ्या संख्येने उभ्या होत्या. दरम्यान, यावेळी स्लॅबवर जाऊ नका असे सांगत तो तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, कोणीही ऐकले नाही. अचानक स्लॅब तुटल्याने त्यावर उभ्या असलेल्या महिला, मुली विहिरीत कोसळल्या. विहीर खूप खोल होती आणि तिच्यात बरेच पाणी होते. विहिरीची दुरवस्था व त्यातील पाणी यामुळे जखमींना बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.
पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांची सुटका केली. मात्र, दीड तास लागला आणि तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 11 जखमींना जिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर कोतवा सीएचसीमध्ये दाखल असलेल्या दोन मुलांचाही मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…