leaders stopped at ghazipur border
नवी दिल्ली : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज ७२ वा दिवस आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या विरोधी पक्षाच्या १५ खासदारांना पोलिसांकडून गाझीपूर सीमेवरच अडवण्यात आलं आहे. या खासदारांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यापासून अडवण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे.
शिरोमणी अकाली दल (SAD), द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि तृणमूल काँग्रेससहीत इतर पक्षांचे १५ खासदार गाझीपूर सीमेवर दाखल झाले होते. आंदोलनावर बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न या खासदारांकडून करण्यात आला. परंतु, नेत्यांना पोलिसांनी बॅरिकेडिंग पार करून आंदोलन स्थळावर जाण्याची आणि शेतकऱ्यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट न घेताच त्यांना माघारी परतावं लागलं.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…