Register before 31st March under PM Kisan Yojana and you will get double benefit
नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता सरकारकडून लवकरच मिळणार आहे. दरवर्षी या योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना ६००० रुपये 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये देते. त्याअंतर्गत दर वर्षाचा पहिला हप्ता १ एप्रिल ते 3१ जुलै, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आणि तिसरा हप्ता १ डिसेंबर ते 3१ मार्च दरम्यान येतो. सरकारने आतापर्यंत 7 हप्ते जाहीर केले आहेत.
31 मार्चपूर्वी करा नोंदणी :
आपण अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आपली नोंदणी केली नसेल तर 31 मार्चपूर्वी नोंदणी करण्याची संधी आहे. जर आपण 3१ मार्चपूर्वी नोंदणी केली आणि आपला अर्ज स्वीकारला गेला तर होळीनंतर आपल्याला २००० रुपये मिळतीलच त्याचबरोबर एप्रिल किंवा मे महिन्यात येणाऱ्या हप्त्याचे 2000 रुपये देखील मिळतील.
अशा प्रकारे करू शकता नोंदणी :
या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. आपण घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त आपण पंचायत सचिव किंवा स्थानिक सामान्य सेवा केंद्राद्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकता. आपण या योजनेसाठी स्वतः देखील नोंदणी करू शकता.
2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत पूर्वी काही चुका आढळल्या, ज्या सुधारण्याचे सरकारने ठरविले आहे. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकर्यांना आता अर्जात त्यांचा भूखंड क्रमांक नमूद करावा लागेल. तथापि, या नवीन नियमांचा योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थींवर परिणाम होणार नाही.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…