platform ticket price raised from rs 10 to rs 30
मुंबई : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकीट देणं बंद केलं होतं. परंतु, वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना स्टेशनवर सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा सुरू करण्यात आलंय. पण १० रुपयांना मिळणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता प्रवाशांना तीन पट जास्त अर्थात ३० रुपये मोजावे लागणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड या स्थानकांनी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर ३० रुपयांवरून ५० रुपयांवर नेण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात कमी अंतराच्या प्रवाशांच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर आता ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात येतेय. कोरोना काळात अनावश्यक प्रवासाला आळा घालण्यासाठी ‘किंचित भाडेवाढ’ केल्याचं स्पष्टीकरण यावेळी रेल्वे प्रशासनानं दिलं होतं. रेल्वे प्रशासनाकडून करोनाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट सुरू असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…