देश

‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, १९ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बन्सल काही दिवसांपासून सर्दी-तापानं आजारी होते. त्यामुळे कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोना संसर्ग त्यांच्या फुफ्फुसापर्यंत पोहचला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

सुनील बन्सल पतंजली आयुर्वेदच्या डेअरी व्यवसायाचा कार्यभार २०१८ पासून सांभाळत होते. बन्सल यांनीच संस्थेला दूध, दही, ताक आणि पनीरसहीत इतर डेअरी प्रोडक्ट तयार करण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर पतंजलीने हे सर्व पदार्थ बाजारात आणले होते.

बाबा रामदेव यांच्या ऍलोपॅथीबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला निषेध

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago