mother in law and daughter in law death in river narmada while taking selfi
मध्य प्रदेशातील जबलपूर येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. जिथे सेल्फी घेण्याच्या नादात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना न्यू भेडाघाट येथील धबधब्याजवळ घडली आहे. घाटकोपर, मुंबई येथील एक कुटुंब तिथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी सेल्फी घेताना सासू आणि होणारी सून या दोघी सेल्फी घेताना तोल जाऊन नर्मदा नदीत वाहून गेल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू हंसा सोनी धबधब्याजवळील खडकावर आपली भावी सून रिद्धीसोबत सेल्फी घेत होती. यावेळी सासूचा पाय घसरला आणि त्या दोघीही नर्मदा नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्या. सासूचा मृतदेह काही तासांनंतर सापडला तर, सुनेचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मुंबईतील घाटकोपर भागातील आहे. शुक्रवारी 50 वर्षीय हंसा सोनी आपल्या भावी सून, 22 वर्षीय रिद्धी पिछडीया आणि अरविंद आणि राज सोनी यांच्यासह नवीन भेडाघाट येथे फिरायला आल्या होत्या. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास हंसा आणि रिद्धी या दोघी नवीन भेडाघाट येथील नर्मदेच्या काठावरील गोपाला हॉटेलजवळ सेल्फी घेण्यासाठी गेल्या. यावेळी त्या खडकावर उभ्या होत्या, त्यावेळी अचानक पाय घसरल्यामुळे दोघीही नदीत पडल्या. या दोघी नदीत पडताच सर्वत्र मदतीसाठी आरडाओरडा झाला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ बचावकार्यात सहभागी झाले. डाइव्हर आणि होमगार्डच्या मदतीने रात्री उशिरा हंसा सोनी यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला, मात्र रिद्धीचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे.
धबधब्यात पडण्याच्या काही वेळापूर्वी रिद्धीने तिच्या भावी नवऱ्यासोबत सेल्फीही घेतली होती, जी तिची शेवटची सेल्फी ठरली. हे कुटुंब १२ जानेवारीला मुंबईला परतणार होते. मात्र त्यापूर्वीच ही दुःखद घटना घडल्यामुळे अरविंद आणि राज सोनी यांना मोठा धक्का बसला आहे. ते काही बोलण्याच्या मनस्थितीतही नाहीत. सध्या पोलिसांनी पंचनामा करून दोघींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
सेल्फीमुळे जीव गमवावा लागल्याची भेडाघाटातील ही पहिलीच घटना नाही. भेडाघाटातील या धबधबा परिसरात सुरक्षा व्यवस्था नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पर्यटकांना रोखण्यासाठी येथे सुरक्षा कर्मचारी हजर नसतात. तसेच येथे धोकादायक ठिकाण असल्याचे फलक देखील लावलेले नाहीत.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…