lpg
नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरसंदर्भात लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यातच गॅस सिलिंडर सबसिडीबद्दल बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की सरकारने सबसिडी बंद केली आहे. अनेकजण म्हणतात की आता त्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे येत नाहीत. एलपीजी सिलिंडरवर लोकांना मिळणाऱ्या सबसिडीबद्दल निर्माण झालेले प्रश्न आता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहेत. जर तुम्हीही अशाच काही प्रश्नांमध्ये गोंधळलेले असाल, तर याबद्दल जाणून घेऊया…
सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे की सरकारने अनुदान बंद केलेले नाही, ते अजूनही चालू आहे, आणि लाभार्थी त्याचा लाभ घेत आहेत. अनुदानासंदर्भात, दिल्लीचे ग्राहक सीएल शर्मा यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाला टॅग करून ट्विट केले आणि त्यात गॅस एजन्सीची स्लिप जोडून विचारले की “आम्ही पुन्हा एकदा जाणून घेऊ इच्छितो की मोदी सरकारने एलपीजी वरील सबसिडी बंद केली आहे का? कारण गेल्या 18 महिन्यात सबसिडीचा एक पैसाही आमच्या खात्यात आलेला नाही, तथापि, गॅस एजन्सी वाउचरवर 859 रुपये यासह सबसिडीचे सिलिंडर असे लिहिते.
ग्राहकाच्या या प्रश्नाला सरकारने ट्विट करून उत्तर दिले आणि म्हटले की, प्रिय ग्राहक नोट करा – सबसिडी बंद केली गेलेली नाही. सध्या घरगुती एलपीजी गॅसवरील सबसिडी प्रचलित आहे आणि ती वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळी उपलब्ध आहे. ही योजना 2014 नुसार सुरु असून, ‘अनुदानित सिलेंडरची किंमत’ आणि ‘विनाअनुदानित सिलेंडरची बाजारात निर्धारित किंमत’ यातील जो फरक असतो, त्यानुसार एखाद्या बाजारासाठी अनुदानाची रक्कम निश्चित केली जाते. याचा अर्थ यातील फरक ० रुपये असल्यास अनुदानाची रक्कम मिळत नाही.
तुम्ही तुमची सबसिडी सोडून देण्यासाठी अर्ज केला असेल, तर तुम्हाला एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळत नाही. याशिवाय आधार कार्ड लिंक नसले, तरी सबसिडी बंद केली जाते. एलपीजीची सबसिडी सर्व राज्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना सबसिडीचा लाभ मिळत नाही, परंतु यापेक्षा कमी कमाई करणारे लोक अनुदानासाठी अर्ज करू शकतात.
गॅस सिलेंडर सबसिडीचा लाभ मिळत नसेल तर काय करावे? जाणून घ्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…