देश

पब्लिसिटी स्टंट! जुही चावलाची 5G विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली, 20 लाखांचा दंड

नवी दिल्ली : जुही चावलाने भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही 5G विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका पब्लिसिटीसाठी असल्याचं सांगत जुही चावलाला कोर्टानं 20 लाखांचा दंड ठोठावला आहे.

जूही चावला हिने 5G वायरलेस तंत्रज्ञानामुळे मानवांवर गंभीर आणि अपरिवर्तनीय परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व परिसंस्थांना कायमची हानी पोहोचण्याचा धोका आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने जूही चावला हिची याचिका फेटाळताना म्हटले की याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केला आहे आणि यामुळे जुही चावलाला २० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले की हा खटला केवळ प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आला होता, असे दिसत आहे आणि म्हणूनच जुही चावला यांनी सुनावणीची लिंक देखील सोशल मीडियावर शेअर केली होती. तसेच या याचिकेतील थोडीशी माहिती योग्य असली तरी बाकीच्या फक्त शंका व्यक्त केल्या आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago