नवी दिल्ली : जुही चावलाने भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही 5G विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका पब्लिसिटीसाठी असल्याचं सांगत जुही चावलाला कोर्टानं 20 लाखांचा दंड ठोठावला आहे.
जूही चावला हिने 5G वायरलेस तंत्रज्ञानामुळे मानवांवर गंभीर आणि अपरिवर्तनीय परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व परिसंस्थांना कायमची हानी पोहोचण्याचा धोका आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने जूही चावला हिची याचिका फेटाळताना म्हटले की याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केला आहे आणि यामुळे जुही चावलाला २० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले की हा खटला केवळ प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आला होता, असे दिसत आहे आणि म्हणूनच जुही चावला यांनी सुनावणीची लिंक देखील सोशल मीडियावर शेअर केली होती. तसेच या याचिकेतील थोडीशी माहिती योग्य असली तरी बाकीच्या फक्त शंका व्यक्त केल्या आहेत.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…