देश

बिहारमध्ये १०० जणांना घेऊन जाणारी बोट नदीत पलटली; 5 जणांचे मृतदेह हाती; अनेक जण बेपत्ता

भागलपूर : बिहारमध्ये १०० लोकांना घेऊन जाणारी बोट थेट नदीत पलटल्याने ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वीच समोर आली आहे. तसेच अनेक जण अजूनही बेपत्ताच असल्याचं समजतं आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू आहे. बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकं भरल्याने ही बोट पलटी झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. स्थानिक प्रशासन घटनास्थळी आहे आणि बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकं भरल्याने ही बोट पलटी झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला बोट नदीच्या जोरदार प्रवाहात अडकली आणि मग अचानक पलटी झाली. यावेळी बोटीत अनेक महिला देखील होत्या. यावेळी, आसपासच्या लोकांनी काही प्रमाणात तात्काळ मदत करत काही जणांना बाहेर काढून त्यांचे जीव वाचवले. दरम्यान, काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातग्रस्त बोटीमध्ये काही कामगार, शेतकरी, महिला आणि मुलं हे बसले होते. जे आपल्या शेतात काम करण्यासाठी गंगा नदीच्या पलीकडे जात होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago