देश

बिहारमध्ये १०० जणांना घेऊन जाणारी बोट नदीत पलटली; 5 जणांचे मृतदेह हाती; अनेक जण बेपत्ता

भागलपूर : बिहारमध्ये १०० लोकांना घेऊन जाणारी बोट थेट नदीत पलटल्याने ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वीच समोर आली आहे. तसेच अनेक जण अजूनही बेपत्ताच असल्याचं समजतं आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू आहे. बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकं भरल्याने ही बोट पलटी झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. स्थानिक प्रशासन घटनास्थळी आहे आणि बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकं भरल्याने ही बोट पलटी झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला बोट नदीच्या जोरदार प्रवाहात अडकली आणि मग अचानक पलटी झाली. यावेळी बोटीत अनेक महिला देखील होत्या. यावेळी, आसपासच्या लोकांनी काही प्रमाणात तात्काळ मदत करत काही जणांना बाहेर काढून त्यांचे जीव वाचवले. दरम्यान, काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातग्रस्त बोटीमध्ये काही कामगार, शेतकरी, महिला आणि मुलं हे बसले होते. जे आपल्या शेतात काम करण्यासाठी गंगा नदीच्या पलीकडे जात होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago