Mumbai Interior designer Anvay Naik Suicide Case Information
इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी अन्वय नाईक व त्यांच्या आईनं आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली, हे पटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी अर्णब यांच्या अटकेसंदर्भात संशय व्यक्त केला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं कि, ‘अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत नव्हतं. म्हणून अलिबागमध्ये माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली त्याचे कारण पैसे होऊ शकत नाही, काही लोकांचं म्हणणं आहे ती आत्महत्या नाही. सत्य बाहेर येईलच.’
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…