देश

पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार, केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने सर्वांना हैराण केले आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. यात उष्णतेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय कृती आराखड्याचा सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रसार करण्याचे आवाहन केले.

केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेसे पिण्याचे पाणी, आवश्यक औषधे आणि उपकरणांची पुरेशी उपलब्धता व सज्जता ठेवण्यास सांगितले आहे. पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता आणि गंभीर स्थिती असलेल्या भागांत गारवा देणारी उपकरणे सतत कार्यरत राहतील, याची खात्री करण्याची सूचना केली आहे. सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये १ मार्चपासून एकात्मिक रोग निरीक्षण कार्यक्रमाच्या (आयडीएसपी) अंतर्गत उष्णतेशी संबंधित आजारांवर दैनंदिन देखरेख सुरू करण्यात आल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

राज्यांच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान, व्यवस्थापन आणि क्षमता वाढविण्याबाबत जागरुक करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असेही या पत्रात नमूद आहे. आवश्यक औषधे, आयव्ही फ्लुइड्स, बर्फाची पाकिटे, ओआरएस आणि इतर सर्व आवश्यक उपकरणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी आरोग्य सुविधेच्या सज्जतेचा आढावा घेतला पाहिजे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

बाहेरील उच्च तापमान आणि घरातील तापमानाच्या वारंवार होणाऱ्या फरकामुळे उष्णतेचा परिणाम जाणवू शकतो. यामुळे उष्णतेशी संबंधित आजार होऊ शकतात, असे पत्रात म्हटले आहे. उष्म्यामुळे पुरळ येणे, हात, पाय आणि पायाच्या घोट्याला सूज येणे तसेच जळजळ होणे, स्नायूंमध्ये उसण भरणे, उष्माघात, चक्कर येणे या तक्रारी उद्भवू शकतात.

हे करा

  • अधिकाधिक पाणी प्यावे
  • आपले शरीर शक्यतो संपूर्ण झाकून घ्यावे
  • शक्य तितके घरात राहावे
  • कामगारांना कामाच्या ठिकाणी थंड पिण्याचे पाणी दिले जावे
  • कामगारांनी थेट सूर्यप्रकाश जाताना सावधगिरी बाळगावी
  • कामगारांसाठी कामाची जागा सावलीत उपलब्ध करून द्यावी

हे टाळा

  • नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये, विशेषत: दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडणे टाळावे
  • चहा, कॉफी किंवा मोठ्या प्रमाणात मद्यपान टाळा किंवा साखर मिसळलेले पेय टाळा
  • उच्च प्रथिनेयुक्त अन्न, तसेच शिळे अन्न टाळा
  • पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

3 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

3 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago