देश

झारखंडमध्ये मालगाडीचे २० डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवांवर मोठा परिणाम

झारखंड : झारखंडमधील सरायकेला-खरसवान जिल्ह्यातील चांडिलजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात एका मालगाडीचे तब्बल २० डबे रुळावरून घसरले. या घटनेमुळे आग्नेय रेल्वेच्या चांडिल-टाटानगर विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (आद्रा विभाग) विकास कुमार यांनी सांगितले की अपघातानंतर चांडिलपासून अप आणि डाउन दोन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा तातडीने बंद करण्यात आली. या अपघातात दोन मालगाड्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

घटनास्थळी रेल्वे कर्मचारी आणि यंत्रणा तैनात असून, रुळावरून घसरलेले डबे हटवणे व खराब झालेले ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या व्यत्ययामुळे अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द, वळवण्यात किंवा शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. रद्द सेवांमध्ये 20894 पटना–टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस, 28181 टाटानगर–कटिहार एक्सप्रेस आणि 28182 कटिहार–टाटानगर एक्सप्रेसचा समावेश आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अद्ययावत वेळापत्रक व मार्गाबाबत अधिकृत स्रोतांकडून माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago