farmers road blockade or chakka jam or Bharat Bandh
नवी दिल्ली : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दुपारी १२ ते ३ या वेळेत चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले. दुपारी तीन वाजता शेतकरी त्यांच्या वाहनांचे हॉर्न एक मिनिटासाठी वाजवून शेतकरी एकतेचे प्रदर्शन करतील. दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे आंदोलन करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून राजधानी दिल्लीसह देशभर ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा सतर्क आहे.
आंदोलनादरम्यान अँब्युलन्स, शाळांच्या बस तसेच अत्यावश्यक सेवेशी संबंधित वाहने अडवणार नाही, असे शेतकऱ्यांनी जाहीर केले. कोणत्याही प्रकारची हिंसा आणि नासधूस करणार नसल्याचेही शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे.
शेतकऱ्यांशी मागील दोन महिन्यांत ११ वेळा चर्चा झाली आहे. अद्याप शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कोणत्याही संघटनेने कृषी कायद्यांविषयीचा त्यांचा आक्षेप नेमकेपणा सांगितलेला नाही. काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळीही शेतकरी संघटना अथवा त्यांच्या वकिलाला आक्षेप नेमकेपणाने सांगता आले नाही. प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार चर्चेला कायम तयार आहे. मात्र आंदोलन करणाऱ्यांनी कृषी कायद्यांविषयीचे त्यांचे आक्षेप सांगावे असे आवाहन केंद्र सरकारने केले. या आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी शेतकरी संघटनांनी ‘चक्का जाम’ आंदोलन जाहीर केले आहे.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…