Farmers arrive at Jantar Mantar to protest; security tightened at border
दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने (SKM) जंतरमंतरवर बेरोजगारीच्या निषेधार्थ पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-मेरठ महामार्गावरील गाझीपूर सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
रविवारी भारतीय किसान युनियन (BKU) नेते राकेश टिकैत यांनी आरोप केला की दिल्ली पोलिसांनी त्यांना राष्ट्रीय राजधानीकडे जात असताना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, नवी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेनुसार टिकैत यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर सोडण्यात आले. त्यांना परत येण्यास सांगण्यात आले आणि मागे पाठवले.
संयुक्त किसान मोर्चाच्या सभेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि हरियाणा या दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. समीर शर्मा, डीसीपी (बाह्य) यांनी सांगितले कि, “आम्हाला जंतरमंतर येथील महापंचायतीबद्दल माहिती मिळाली. आम्हाला सांगण्यात आले आहे की संयुक्त किसान मोर्चाचे आंदोलक आणि इतर गट सीमेवरून आंदोलनाच्या ठिकाणी जातील. मिळालेल्या माहितीनुसार, बाह्य जिल्ह्याच्या परिसरात म्हणजे टिकरी सीमा, प्रमुख चौक, रेल्वे ट्रॅक आणि मेट्रो स्टेशनवर स्थानिक पोलिस आणि बाहेरील सैन्याची पुरेशी तैनाती केली जाईल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे केले जाणार आहे. या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्ण व्यवस्था आधीच करण्यात आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…