Taj Mahal to be open to tourists
नवी दिल्ली : देशभरातील सर्व स्मारके, संग्रहालये आणि पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून हा प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारने यानिमित्ताने मोठी घोषणा केली आणि सांगितले की, 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत देशभरात ताजमहाल, कुतुबमिनार आणि लाल किल्ला यासारख्या सर्व स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश असेल.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. देशातील जनतेला स्वातंत्र्याच्या सणाशी जोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जी किशन रेड्डी यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या आदेशाबाबत ट्विट केले आणि लिहिले, ‘स्वातंत्र्य आणि 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, 5 ते 15 ऑगस्ट २०२२ पर्यंत देशभरातील सर्व संरक्षित स्मारके / स्थळांवर पर्यटकांसाठी प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. ASI च्या स्मारक-II चे संचालक डॉ एन के पाठक यांनी हा आदेश जारी केला आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीमही सुरू केली आहे. या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन सर्वसामान्यांना करण्यात आले आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…