deaths due to lightning in many states of the country
नवी दिल्ली : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वीज पडणे अतिशय सामान्य आहे. परंतु, ही वीज पडल्याने बर्याचदा लोकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. रविवारी राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह इतर काही राज्यात वीज पडल्याने अनेक लोकांचा बळी गेला.
जयपूरमध्ये वीज कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 11 जणांचा जयपूरच्या आमेर किल्ल्यावर बांधलेल्या वॉच टॉवरवर मृत्यू झाला. हे लोक येथे सेल्फी घेत असतांना वीज कोसळली, त्यावेळी सुमारे 35 लोक तिथे उपस्थित होते. वीज कोसळल्याने बरेच लोक खाली पडले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, विज चमकणे आणि वीज कोसळणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपणास आश्चर्य वाटेल, पण पृथ्वीवर वीज पडण्याच्या घटना जवळजवळ दर मिनिटाला घडतात. जेव्हा विज कोसळते, तेव्हा आकाशातील तापमान सुमारे 15,000 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत असू शकते. वीज केव्हा व कोठे कोसळेल, हे सांगता येत नाही.
प्रतिबंधात्मक उपाय :
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…