देश

देशात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून अनेक जणांचा मृत्यू, विजेपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ उपाय

नवी दिल्ली : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वीज पडणे अतिशय सामान्य आहे. परंतु, ही वीज पडल्याने बर्‍याचदा लोकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. रविवारी राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह इतर काही राज्यात वीज पडल्याने अनेक लोकांचा बळी गेला.

जयपूरमध्ये वीज कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 11 जणांचा जयपूरच्या आमेर किल्ल्यावर बांधलेल्या वॉच टॉवरवर मृत्यू झाला. हे लोक येथे सेल्फी घेत असतांना वीज कोसळली, त्यावेळी सुमारे 35 लोक तिथे उपस्थित होते. वीज कोसळल्याने बरेच लोक खाली पडले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, विज चमकणे आणि वीज कोसळणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपणास आश्चर्य वाटेल, पण पृथ्वीवर वीज पडण्याच्या घटना जवळजवळ दर मिनिटाला घडतात. जेव्हा विज कोसळते, तेव्हा आकाशातील तापमान सुमारे 15,000 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत असू शकते. वीज केव्हा व कोठे कोसळेल, हे सांगता येत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय :

  1. आपण घरात असाल आणि वादळ किंवा पाऊस सुरु असेल तर, आपल्या टीव्ही, रेडिओ, फ्रिज किंवा इतर विद्युत उपकरणे बंद करा आणि अशा वस्तूंचे प्लग काढून ठेवा.
  2. पावसात मोबाइल वापरणे टाळा.
  3. अनवाणी पायाने जमिनीवर उभे राहू नका.
  4. विद्युत उपकरणांपासून दूर रहा. तसेच, अशा गोष्टींपासून दूर रहा जे विजेचे वाहक होऊ शकतात. जसे लोखंडी पाईप्स इ.
  5. झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात जाणे टाळा आणि इमारतीच्या खाली लपून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करा.
  6. आपल्याकडे रबरचे बूट असल्यास, घरातून बाहेर पडताना शक्यतो त्यांचा वापर करा.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…

13 तास ago

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

13 तास ago

भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…

13 तास ago

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ : वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकीचा संगम

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…

13 तास ago

राज्यात सात जिल्ह्यांत एमआरआय सेवेचे लोकार्पण ; ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवेचा विस्तार

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…

13 तास ago

फार्मर आयडी :२० मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन, अन्यथा योजनांचा लाभ बंद

मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…

13 तास ago