Congress MP Adhir Ranjan Chowdhury responded to the row over his remark on President Murmu
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केलेल्या टीकेवर झालेल्या वादाला उत्तर देताना ते म्हणाले, “मी हे फक्त एकदाच बोललो. माझी जीभ घसरली होती. हा सगळा मुद्दा भाजपकडून मोठा केला जात आहे आणि विनाकारण वाद निर्माण केला जात आहे.”
चौधरी यांनी एका व्हिडिओ क्लिपमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘राष्ट्रपत्नी’ असा उल्लेख केला होता. त्यांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्षांना या विषयावर सभागृहात बोलण्याची संधी देण्याची मागणी केली.
या वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया
दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चौधरी यांच्या ‘राष्ट्रपत्नी’ वक्तव्यावर सोनिया गांधी यांची निंदा केली आणि सोनियांनी मुर्मू यांची माफी मागावी, असे सांगितले. द्रौपदी मुर्मू यांचा अपमान सोनिया गांधींनी मंजूर केला आणि सोनिया यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कार्यकर्ते घटनात्मक पदांवरील महिलांना अपमानित करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, पक्षाने संसदेत आणि भारतातील रस्त्यांवर माफी मागितली पाहिजे.
स्मृती म्हणाल्या की, जेव्हापासून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली, तेव्हापासून काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या पुढे म्हणाल्या, “काँग्रेसच्या सदस्यांना हे माहित होते की राष्ट्रपतींना संबोधित करण्याचा हा मार्ग केवळ त्यांच्या संवैधानिक पदाचाच नव्हे तर ती प्रतिनिधित्व करत असलेल्या समृद्ध आदिवासी वारशाचाही अपमान करतो. अशा पद्धतीने त्यांना अपमानित करणे म्हणजे आपल्या देशातील महिलांच्या क्षमतेची निंदा करणे आहे.”
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्मृती इराणी यांच्या विधानाचे प्रतिध्वनित केले आणि ते म्हणाले की, सोनिया गांधी यांनी चौधरी यांची पक्षनेतेपदी नियुक्ती केली असल्याने त्यांनी अध्यक्षांची माफी मागितली पाहिजे.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपच्या खासदारांनीही चौधरी यांच्या विधानाचा संसदेत निषेध केला आणि काँग्रेस पक्षाने माफी मागावी अशी मागणी केली.
काँग्रेसचा प्रतिसाद
सोनिया गांधी यांनी भाजप नेत्यांच्या मागणीला उत्तर देतं म्हटले की चौधरी यांनी आधीच माफी मागितली आहे. तर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, चौधरी यांची टिप्पणी अनावधानाने करण्यात आली असून त्यांच्या चुकीमुळे मोठे आंदोलन करणे चुकीचे आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…