Corona Vaccine
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील सागर येथील जैन पब्लिक स्कूलमध्ये 30 शाळकरी मुलांना एकाच सिरिंजने कोरोनाची लस दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेची माहिती पालकांना मिळताच त्यांनी शाळेत पोहोचून एकच गोंधळ घातला. या गोंधळानंतर सीएमएचओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी लसीकरण करणारे व लसीकरण अधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. लसीकरण करणार्यावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
जैन पब्लिक स्कूलमध्ये बुधवारी शाळकरी मुलांसाठी कोरोना लस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आरोग्य विभागाने एका खासगी नर्सिंग कॉलेजच्या नर्सिंग विद्यार्थ्याची ड्युटी लावली होती. लसीकरण करणाऱ्या जितेंद्र या नर्सिंगच्या विद्यार्थ्याने एका सिरिंजने सुमारे ३० मुलांना कोरोनाची लस दिली. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांना ही बाब कळाली आणि त्यांनी घरी जाऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लगेचच पालक शाळेत पोहोचले आणि त्यांनी शाळेत एकच गोंधळ घातला.
असा झाला खुलासा
जैन पब्लिक स्कूलच्या एका विद्यार्थिनीने घरी जाऊन तिच्या वडिलांना सांगितले की “तिच्या शाळेत लसीकरण शिबिर सुरू केले आहे. परंतु लसीकरण करणारा सर्वांना एकाच सिरिंजने कोरोनाची लस देत आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि लसीकरणकर्त्याला विचारणा केली असता त्यांनी आपली चूक मान्य केली आणि त्यांना फक्त एकच सिरिंज दिल्याचे सांगितले.
तपासाचे आदेश
घटनेची माहिती मिळताच सागरचे जिल्हा मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. डीके गोस्वामी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह जैन पब्लिक हायस्कूलमध्ये पोहोचले आणि त्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एकाच सिरिंजमधून 30 बालकांना लस दिल्याने त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल, या प्रश्नावर ते म्हणाले की, लसीकरण झालेल्या सर्व बालकांची वारंवार आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर लसीकरण करणारा बेपत्ता गोपाळगंज पोलीस ठाण्यात लसीकरण करणारा जितेंद्र अहिरवार याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. येथे प्रकरण तापल्यानंतर लसीकरण करणारा फरार झाला आहे. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याचा फोन बंद असल्याचे आढळून आले.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…