centre writes to states to increase the interval between two doses of covishield vaccine
नवी दिल्ली : भारतात पुन्हा कोरोना व्हायरसच्या संसर्गामध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने कोविशील्ड संदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. केंद्राने राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारांना कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यास सांगितले आहे. एनटीजीआय आणि एनईजीव्हीएसीच्या शिफारशीनुसार या दोन डोसमधील अंतर 6-8 आठवडे करण्यास सांगितले आहे.
नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप आणि लस प्रशासनावरील नॅशनल एक्सपर्ट ग्रुपच्या सूचनेनंतर हे पत्र राज्यांना लिहिले गेले आहे. दुसरा डोस कोणत्याही परिस्थितीत 8 व्या आठवड्यात देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ही सूचना केवळ कोविशील्डवर लागू होणार आहे. सध्या भारतभर कोविशील्ड लसीचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जात आहेत. नवीन शिफारसींमध्ये असे म्हटले आहे की कोविशील्ड चा दुसरा डोस सद्य 28 दिवसांच्या अंतरांऐवजी 6-8 आठवड्यांनंतर दिला तर रोग प्रतिकारशक्ती आणखी वाढू शकते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…