देश

ऑडी कार विजेच्या खांबाला धडकून भीषण अपघात, आमदाराच्या मुलगा आणि सुनेसह ७ जणांचा मृत्यू

बंगळुरु : बंगळुरुच्या कोरमंगलामध्ये ऑडी कारचा भीषण अपघात झाला. कारचा वेग खूप जास्त असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही कार विजेच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तामिळनाडूचे डीएमकेचे आमदार वाय प्रकाश यांचा मुलगा करुणा सागर आणि सून बिंदू यांच्यासह ७ जणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून कारमधील सर्वजण 20 ते 30 वयोगटातील होते. हे सर्वजण ऑडी कार घेऊन रात्री फिरायला निघाले होते. रस्ता पूर्णपणे रिकामा असल्याने या गाडीचा चालक वेगाने गाडी चालवत होता. गाडी वेगात असल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी फुटपाथवर चढून विजेच्या खांबाला जोरात धडकली. रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील कुणीही सीटबेल्ट लावलेला नव्हता. या प्रकरणी आडुरुडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago