A tragic accident near Sribalaji in Nagaur in Rajasthan
राजस्थान : राजस्थानमधील नागौर येथे श्रीबालाजीजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मध्य प्रदेशातील 12 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. नोखा बायपासवर जीप आणि ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली. सर्व मृत हे मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील सज्जन खेडा आणि दौलतपूर गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, या 12 सीटर जीपमध्ये 18 लोक बसलेले होते. रामदेवरा येथे दर्शन घेतल्यानंतर हे सर्व लोक देशनोक करणी माता येथे दर्शन घेऊन मध्य प्रदेशला निघाले होते. दरम्यान, नागौरहून नोखाकडे जाणारा ट्रेलर आणि जीप यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात नेत असताना तीन जणांचा मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनेक लोकांचे मृतदेह जीपमध्येच अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…