At Least 20 People Feared Dead As Boat Capsizes In UP’s Banda
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात आज यमुना नदीत मोठी दुर्घटना घडली. ३० हून अधिक लोक बोटीतून प्रवास करत होते, ती बोट नदीत बुडाली. सध्या या दुर्घटनेत 20 जण बुडाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. ही बोट फतेहपूरला जात होती, लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू असल्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक बांदा व इतर अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात गोताखोर, बोटी आदींच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याच्या सूचना
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांदा येथील यमुना नदीत बोट दुर्घटनेप्रकरणी जिल्हा प्रशासनाला तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांना संवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा दंडाधिकारी, डीआयजी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाला तातडीने घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…