uddhav thackeray gives wishes of dussehra
मुंबई : विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करुन विजय खेचून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊ. आपण एकजुटीने करोनारुपी रावणाचा नाश करुया. करोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल असाही विश्वास दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसंच महाराष्ट्राच्या जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले कि, लढवय्या महाराष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वीपणे सामना केला आहे. करोनाच्या संकटात निसर्गाचीही अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगमगता आपण सामोरे जात आहोत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्यांनी खूपच संयम दाखवला आहे. घराघरापर्यंत पोहचून करोना विषाणूचा पाठलाग करुन त्याला रोखण्यासाठी करोना योद्धे काम करत आहेत. करोना विषाणूला पराजित करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवत आहोत. सर्व धर्मीयांनी आपले सण आणि उत्सव घरीच साजरे केले. विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आपण साजरा करणार आहोत. दसरा हा सण संकटांवर, वाईट प्रवृत्तींवर मात करण्यासाठी सीम्मोलंघन करुन विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आपण दसरा उत्साहात साजरा करत असतानाच करोना विषाणूच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे, गर्दी न करण्याचे, शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…