छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटांमध्ये झालेल्या चकमकींदरम्यान शहरात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात किराडपुरा परिसरात घडलेल्या घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 3500 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. घटनेबाबत सोशल मीडियावर कोणीतीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास प्रशासनाच्या वतीने गंंभीर दखल घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आस्तीक कुमार पांडेय म्हणाले, दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आहे. आता शहरात पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली आहे. मी शहरवासियांनी आवाहन करतो की आता येणाऱ्या सर्व सणांमध्ये, महावीर जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, ईदचा पवित्र महिना आहे. हे सगळे सण शांततेने आणि आनंदाने साजरे करा. जे समाजकंटक आहेत त्यांच्यासाठी इशारा आहे, जो कोणी बेकायदेशीर काम करत आहे त्यांच्यावर प्रशासनाचे लक्ष आहे.
सध्या शहरात 3 हजार 500 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले. किराडपुरा परिसरात झालेल्या दंगलीनंतर पालकमंत्री संदिपान भुमरे आणि जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी राम मंदिराला भेट देत घटनास्थळाची पहाणी केली. घटनेचा पोलिसांकडून आढावा घेतला.
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…