Nilesh Rane said the managers of Gharda Chemical Company should be arrested
रत्नागिरीतील लोटे MIDC तील घरडा केमिकल कंपनीत आज सकाळी स्फोट झाला होता आणि त्यानंतर तेथे आग लागली होती. यामध्ये ३ कामगार मृत्युमुखी पडले. या संदर्भात माजी खासदार निलेश राणे यांनी घरडा केमिकल कंपनीच्या व्यवस्थापकांच्या अटकेची मागणी केली आहे. व्यवस्थापकांनी कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. या केमिकल कंपनीत कामगारांकडे केमिकल प्रोटेक्शन किट नसल्यामुळे कामगार मृत्युमुखी पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीतील घारडा केमिकल कंपनीत स्फोट, तीन कामगार ठार
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “लोटे MIDC तील घरडा केमिकल कंपनीत कामगारांकडे केमिकल प्रोटेक्शन किट नसल्यामुळे केमिकल अंगावर पडून कामगार मृत्युमुखी पडले आणि काहीजण गंभीर भाजले. कामगारांवर व्यवस्थापकांच दुर्लक्ष असल्याने घरडा कंपनीच्या व्यवस्थापकांवर IPC 304A अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे.”
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…